शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

...तर सदाभाऊंना तोंड दाखविणे होईल अवघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 01:46 IST

जयसिंगपूर : कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची माझ्याकडे जेवढी कुंडली आहे तेवढी कुणाकडे नाही. त्याबद्दल मी जर बोललो तर सदाभाऊ तुम्हाला महाराष्ट्रात तोंड दाखवायला जागा राहणार नाही, असा इशारा रविकांत तुपकर यांनी त्यांना लगावला.

ठळक मुद्देऊस परिषदेत तुपकर यांचा इशारा सतीश काकडेंसह सर्वच वक्त्यांनी उठविली केंद्र, राज्य सरकारवर टीकेची झोडराज्याच्या प्रश्नांकडे लक्ष द्या

विश्वास पाटील/राजाराम लोंढे/ संदीप बावचे ।जयसिंगपूर : कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची माझ्याकडे जेवढी कुंडली आहे तेवढी कुणाकडे नाही. त्याबद्दल मी जर बोललो तर सदाभाऊ तुम्हाला महाराष्ट्रात तोंड दाखवायला जागा राहणार नाही, असा इशारा रविकांत तुपकर यांनी त्यांना लगावला.येथील विक्रमसिंह मैदानावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सोळाव्या ऊस परिषदेत ते बोलतहोते. ‘अच्छे दिन’चे आमिष दाखवून मोदी सत्तेवर आले, परंतु आताअच्छे दिन राहू देत, आमचेपूर्वीचेच दिन परत द्या, असे म्हणायची पाळी लोकांवर आली आहे.

इंदिरा गांधी यांनी आणीबाणी आणल्यावर त्यांची तुलना लोकांनी हिटलरशी केली, परंतु मोदींनी त्यांचेही रेकॉर्ड मोडल्याची टीका तुपकर यांनी केली.राष्ट्रीय किसान समन्वय समितीचे समन्वयक व्ही. एम. सिंग म्हणाले, ‘देशभरातील १८२ शेतकरी संघटना एकत्र आल्या आहेत. त्यामुळे शेतकºयांवर गोळ््या झाडण्याचे धाडस कुण्या मोदी अथवा शिवराजसिंह यांना होणार नाही. देशभरातील शेतकरी २० नोव्हेंबरला दिल्लीत धडक देऊन मोदी यांच्याकडे हिशेब मागतील.शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष सतीश काकडे यांनी, सदाभाऊ खोत यांनी काय बोलायचे याचेभान न बाळगल्यास त्यांच्या अंगावर कपडे राहणार नाहीत, असा इशारा दिला.परिषदेतील महत्त्वाचे ठरावऊस उत्पादकांना २०१७-१८च्या हंगामासाठी पहिली उचल विनाकपात एकरकमी३४०० रुपये द्या.राज्य बँकेने कारखान्यांना ९० टक्के उचल द्यावी.गतवर्षीची एफआरपी न देणाºया कारखान्यांच्या संचालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करा.गोदाम व कारखान्याच्या गेटवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवा.ऊस बिलातून कोणतीही कपात करण्यास विरोध.साखर आयात करण्यास कडाडून विरोध करणार.ऊस तोडणी मजूर महामंडळास शासनाने निधी करून द्यावा.अत्यंत जोशपूर्ण वातावरणपरिषदेच्या ठिकाणी अत्यंत जोशपूर्ण वातावरण होते. खोत संघटनेतून बाहेर पडल्यानंतर त्यांनी शेट्टी व संघटनेवर केलेली टीका लोकांना आवडली नव्हती. त्यामुळे त्यांना प्रत्त्युतर देण्यासाठी शेतकरी मोठ्या संख्येने आले होते. ढोल-ताशे, एकच गट्टी..राजू शेट्टी अशा घोषणांमुळे वातावरणात उत्साह होता. खोत यांच्यासंबंधी वक्ते बोलू लागल्यावर समुदायातून त्यास फेटे उडवून दाद मिळत होती. स्वत: शेट्टी यांनी मात्र खोत यांचा नामोल्लेखही न करता त्यांना बेदखल केले.पवारांविना परिषद  --ऊस परिषद म्हटली की ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, आर. आर. पाटील यांच्यावर टीकेचा भडिमार असे, परंतु आजच्या परिषदेत त्यांचा साधा नामोल्लेखही झाला नाही. सर्वच वक्त्यांनी मोदी, सदाभाऊ आणि दोन्ही सरकारवर टीका केली.उत्तम संयोजनपरिषदेचे संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उत्तम संयोजन केले. आण्णासाहेब चौगले यांनी स्वागत केले. विठ्ठल मोरे यांनी प्रास्ताविक केले. सांगली जिल्हाध्यक्ष विलास देशमुख, सयाजी मोरे यांचीही भाषणे झाली. कारखानदारांनीही संघटनेची धास्ती घेऊनच दराबाबत वाच्यता केली नाही, असे जिल्हाध्यक्ष भगवान काटे यांनी सांगितले.

सरकारची गाजराची औलाद!राज्य व केंद्र सरकारने आतापर्यंत कर्जमाफी, राममंदिर, काळा पैसा, बाबासाहेब आंबेडकर व शिवाजी महाराजांचे स्मारक, महागाई कमी करणार अशी नुसती सगळी आश्वासनांची डझनभर गाजरे दाखवली.त्यामुळे तोल जातोय  सतीश काकडे म्हणाले, खोत यांच्यासाठी आम्ही मोहिते-पाटील घराण्याचे वैरत्व पत्करले. तुमच्या प्रचारासाठी खिशातील पाच लाख रुपये दिले आणि तरी तुम्ही चळवळीबद्दल अपशब्द वापरता, त्यामुळे आमचा तोल जात आहे.मूल होण्यासाठी फॉर्म

कर्जमाफीसाठी ६६ कॉलमचा फॉर्म भरायला लावणारे राज्य सरकार उद्या नवीन लग्न झालेल्या दाम्पत्याला मूल होण्यासाठीही ६६ कॉलमचा फॉर्म भरायला लावेल, अशी टीका परिषदेत झाली.गतवर्षीची मागणी ३२०० रुपयांचीस्वाभिमानी संघटनेने गतवर्षी टनास एकरकमी ३२००रुपये देण्याची मागणी याच परिषदेत केली होती. नंतर चर्चेतून एफआरपी व १७५ रुपये जादा असा तोडगा निघाला व आंदोलनाची कोंडी फुटली होती. यंदा एफआरपीपेक्षा जादा किती रक्कम मिळणार याविषयी उत्सुकता आहे.तुमचा भुजबळ होईल..सरकारच्या विरोधात जे लोक बोलतात त्यांना भाजपवाले ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, भुजबळ यांचा दाढी वाढवलेला फोटो दाखवितात. मग तो पक्षात येतो म्हटला की थेट भाजपमध्ये न घेता वेगळी संघटना काढायला लावतात. फोडा,झोडा अशी त्यांची नीती असल्याची टीका तुपकर यांनी केली. कर्जमाफीसाठी ६६ कॉलमचा फॉर्म भरायला लावणारे राज्य सरकार उद्या नवीन लग्न झालेल्या दाम्पत्याला मूल होण्यासाठीही ६६कॉलमचा फॉर्म भरायला लावेल अशी टीका परिषदेत झाली.मान्यवरांची उपस्थितीपरिषदेत प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रकाश पोफळे, दशरथ सावंत, महिला आघाडी प्रमुख रसिका ढगे, प्रा. जालंदर पाटील, कर्नाटक रयत संघटनेचे कुमार मुतन्नाप्पा, हंसराज वडगुळे, सांगली जिल्हाध्यक्ष विकास देशमुख, राज्य प्रवक्ता महेश खराडे, बीडच्या पूजा मोरे यांची भाषणे झाली.कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर, बारामती, फलटणपासून ते अहमदनगर, नाशिक विदर्भापर्यंतचे शेतकरी आले होते. संदीप जगताप यांनी कविता सादर केली.भाजपवाल्यांच्या वर लाथशिवछत्रपतींचा आशीर्वाद... .......चला देऊ भाजपला साथ अशी घोषणा देऊन राज्यात भाजपचे सरकार सत्तेत आले. आता पुढच्या निवडणुकीत शिवछत्रपतींचा आशीर्वाद.. चला देऊ भाजपवाल्यांच्या वर लाथ. यासाठी सज्ज व्हा, असे तुपकर यांनी सांगितले.निवडणुकीसाठी निधीराजू शेट्टी यांना लोकसभेच्या २०१९ च्या निवडणुकीसाठी परिषदेत शेतकºयांनी स्वत:हून निधी दिला. यामध्ये लहान मुलेही मागे राहिली नाहीत. दिल्ली येथील मोर्चासाठी रेल्वे खर्च म्हणून उदगावचे माजी सरपंच विश्वास कोळी यांनी ५० हजारांची मदत दिली.दादांच्या खिशात दोन आमदारपालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील दिलेला शब्द पाळत नसल्याचे सांगत प्रा. जालंदर पाटील म्हणाले, दादांच्या वरच्या खिशात दोन आमदार, तर खालच्या खिशात महामंडळे असतात. त्यामुळे ते भाजपमध्ये घेण्याचे आमिष दाखवत सुटले आहेत.एकेरी शब्दात टीकाऊसदराला मटका म्हणणारे पंधरा वर्षे बुकी होते का? असा सवाल करत अनिल मादनाईक म्हणाले, मोटारसायकलवरून फिरणाºयाकडे आलिशान गाडी, बंगला आला कोठून, भान ठेवून बोला, अन्यथा जशास तसे उत्तर देऊ.मोदींचा १६ लाखांचा सूटहिंगोली जिल्ह्यातील एका शेतकºयाने मुलीच्या लग्नात बस्ता घ्यायला १३ हजार रुपये मिळाले नाहीत म्हणून आत्महत्या केली; पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी एका समारंभात १६ लाखांचा सुट घालून मिरवत होते, अशी टीका शेट्टी यांनी केली.गुलाबासह पेरूचा हारभला मोठा गुलाब फुलांसह पेरूंचा हार घालून शेतकºयांनी राजू शेट्टी यांचा सत्कार केला, तर एक वयोवृद्ध शेतकºयाने धडपडत येऊन शेट्टी यांना मिठी मारल्याने सभास्थळावरील वातावरण चांगलेच भावनिक झाले.गुळासाठी टनाला ३४०० रु.तिरपण (ता. पन्हाळा) येथील शेतकरी कृष्णात जाधव यांचा ऊस गुºहाळघरासाठी प्रतिटन ३४०० रुपये दराने आनंदा पाटील या गुºहाळमालकाने घेतला. दहा टनांचा ३४ हजार रुपयांचा धनादेश शेट्टी यांच्या हस्ते संबंधित शेतकºयाला दिला.चळवळीची ताकदसदाभाऊ खोत गेले असले तरी असे शेकडो सदाभाऊ निर्माण करण्याची ताकद शेतकरी चळवळीत आहे. ज्या जनतेने त्यांना खांद्यावर घेतले, तीच उद्या पायाखाली घेतल्याशिवाय राहणार नसल्याची टीका प्रा. जालंदर पाटील यांनी केली.शेट्टीच चळवळीचे वजीरसध्या संघटनेचे पेव फुटल्याचे सांगत सदाभाऊंनी नवीन संघटना काढली आहे. कोणी कितीही डांगोरा पिटला तरी शेतकरी चळवळीचा वजीर राजू शेट्टीच असल्याचे जालंदर पाटील यांनी सांगितले.रामरहीमचा बंदोबस्त कराकेंद्राने हरियाणातील रामरहीमचा फांडाफोड केला. आता राज्यातील ‘रामरहीम’चा बंदोबस्त करा, हा बाबा कोण हे सगळ्यांना माहिती असल्याचा टोला तुपकर यांनी हाणला.मग शेट्टी जातीवादी कसे?आपल्यासारख्या ९६ कुळी मराठा समाजातील कार्यकर्त्याला सर्वप्रथम लाल दिवा देऊन बहुजन समाजाचा सन्मान केला. मग राजू शेट्टी जातीयवादी कसे? असा सवाल तुपकर यांनी केला.दादांनी राज्याच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावेराज्याच्या प्रश्नांकडे लक्ष द्याउसाचा दर संपल्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील सांगत आहेत. ऊसदरासाठी आम्ही सक्षम आहोत, चंद्रकांतदादांनी राज्याच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे, असे प्रकाश पोपळे यांनी सांगितले. 

टॅग्स :PoliticsराजकारणRaju Shettyराजू शेट्टी